1: Source
YouTube
"My name is Anthony Gonsalves" असे गाणं 'अमर अकबर अँथनी' मधला अँथनी म्हणजे अमिताभ बच्चन पडद्यावर म्हणताना पाहिला आहे का? ईस्टर संडेच्या पार्टीमधलं हे गाणं. या पार्टीत अँथनीची एन्ट्री होते तीच एका अंड्या मधून.
Source: Blog BoxOffice |
एका
पोकळ अंड्यातून अँथनी येतो.गाण्याच्या
दरम्यान अंड्यात उडी मारतो, ईस्टरला अंड्याचे
महत्व , तेव्हढेच महत्त्व या गाण्यात ईस्टरच्या अंड्याला सिनेमाचे
दिगदर्शक मनमोहन देसाई यांनी आबाधित ठेवले आहे.
ईस्टर संडे हा दरवर्षी एका रविवारी येणारा
ख्रिस्ती धर्मींयांचा सण. या रविवारच्या आधीचा शुक्रवार हा गुड फ्रायडे (Good
Friday).
ख्रिसमस व ईस्टर संडे हे दोन
ख्रिस्ती धर्मींयांचे महत्त्वाचे सण. यामधला
दरवर्षी ख्रिसमस २५ डिसेंबरलाच साजरा होतो, मात्र ईस्टर
वेगवेगळ्या रविवारी साजरा
केला जातो.
वर्ष
|
महिना
|
दिवस
|
२०१०
|
एप्रिल
|
४
|
२०११
|
एप्रिल
|
२४
|
२०१२
|
एप्रिल
|
८
|
२०१३
|
मार्च
|
३१
|
२०१४
|
एप्रिल
|
२०
|
२०१५
|
एप्रिल
|
५
|
२०१६
|
मार्च
|
२७
|
२०१७
|
एप्रिल
|
१६
|
२०१८
|
एप्रिल
|
१
|
२०१९
|
एप्रिल
|
२१
|
२०२०
|
एप्रिल
|
१२
|
बाजूच्या कोष्टकावरून हे पाहता
येईल. इथे २०१० ते २०२० मधील ईस्टर
संडेच्या तारखा दिल्या आहेत.
ईस्टर संडे हा चंद्रावर अवलंबून असणारा सण आहे. सहाजिकच त्याच्या दरवर्षीच्या तारखा बदलणार. ईस्टर संडेची तारी़ख ठरवताना
२१ मार्चला महत्व आहे. ह्या दिवशी समसमान
काळाचे दिवस व रात्र असतात. या दिवसाला वसंत संपात
(vernal equinox) असे म्हणतात. या दिवसानंतर उत्तर गोलार्धातील देशात वसंत ऋतूचे आगमन होते.
२१ मार्चच्या किंवा वसंतसंपात नंतर येणार्या पहिल्या पौर्णिमेनंतरचा पहिला रविवार हा असतो
ईस्टर संडे.
ख्रिस्ती धर्मींयांच्या मान्यतेनुसार येशू ख्रिस्त यांना शुक्रवारी क्रॉसवर
चढवण्यात आले तर दोन दिवसांनी येशूंनी परत दर्शन दिले, तो
रविवार ईस्टर संडे सहाजिकच आनंदाने
साजरा केला जातो. या दिवशी, येशूंची
शवपेटी रिकामी होती त्याचे प्रतीक म्हणून पोकळ अंडी.
या दिवशी अंड्यांची रंगरंगोटी करून सजावट वगैरे केली जाते.
याच ईस्टर संडेच्या आधी या वर्षी शिवजयंती आली आहे. ही शिवजयंती छत्रपती शिवाजी महारांजांच्या जन्मतिथीवरून साजरी केली जातेय. गंम्मत अशी आहे की, येशूंची जयंती तारखेप्रमाणे २५ डिसेंबरला ख्रिसमस म्हणून साजरी होते व पुण्यतिथी नेहमीच पौर्णिमा आणि वार यांच्या आधारे साजरी होते. आपण शिवजयंती तारखेप्रमाणे व तिथीप्रमाणे दोन्ही प्रकारे साजरी करतो. बरोबर कोण, चूक कोण हा प्रश्न नाही, शेवटी लोकांना जे पटते ते चालू राहते आणि पटत नाही ते काळाच्या ओघात मागे पडत जाते असे वाटते.