Saturday 5 January 2008

उपक्रम वरील चर्चेतला प्रतिसाद http://mr.upakram.org/node/905

कोडे सुटले ?
प्रेषक अवन (सोम, 12/10/2007 - 19:49)
१) कोणी 'दि ग्रेट हेज ऑफ इंडिया' पुस्तक वाचले आहे का? (आमच्या ग्रंथालयामधे तरी हे उपलब्ध नाही). असल्यास त्यात या भिंतीबद्दल असे कोणते पुरावे आहेत?
२) जर अशी १५००मैल लांबीची भिंत बांधली गेली तर् त्याचे उल्लेख समकालीन भारतीय लेखनात मिळतात का? या भिंतीचे नाव होते का?
३) जर अशी भिंत अस्तित्वात होती तर ती आपोआप काळाच्या पडद्याआड गेली की तोडण्यात आली? यावर कोणी प्रकाश टाकू शकेल काय? इतकी मोठी (लांब) भिंत हा ऐतिहासिक ठेव्याबरोबरच स्थापत्याच्या बाबतीतही अनमोल होता. बरिक सारिक गोष्टी जसेच्या तसे सांभाळणार्‍या इंग्रजांनी भिंत तोडली असेल असे वाटत नाही.

यातील तिसर्‍या प्रश्नाचे उत्तर मिळाले असे मला वाटते.

धन्यवाद गुगल!

मॉक्समच्या पुस्तकावरून गुगलत एका महत्त्वाच्या दुव्यापर्यंत आलो. त्यावरून माझी निरीक्षणे पुढे देत आहे.

ब्रिटिशांनी भिंत उभारली नाही तर एक कुंपण तयार केले असावे. ब्रिटिश म्हणजे 'इस्ट ईंडिया कं'.

१६०० काळात पॉटेशियम नायट्रेटला (मीठ) इंधन वा दारूगोळा म्हणून युरोपात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. आणि भारतातील बिहार, पंजाब इ. भागात "नुनीया" (Nuniah) जातीची कुटुंबं एप्रिल ते जूनच्या उन्हाळी मौसमात नापीक जमीनीतून हे मीठ मिळवण्याचा उद्योग करत असतं. कं. ह्या मीठाचा व्यापार करत असे. हे मीठ निर्यात करायची इंग्लडला.

कं. नीला त्यांच्याकडून मिळवलेल्या मीठाची वाहतूक करताना स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत असे. जसा की खंडणी मागणे, लूटालूट, वाह्तूक करणार्‍याची आपआपसातील भांडणं इ.
ह्या आगलाव्या मीठाला मौल्यवान अशा कापूस, रेशीम, मसाल्याचे पदार्थ वस्तूंबरोबर ठेवणे हे जहाजवाल्यांनाही मान्य नव्हते.

तरी अशा दारूगोळा बनवण्याच्या कामात ह्या मीठाला मोठी मागणी होती. इंग्लडात दारूगोळा बनवण्याचे काम एकाच व्यावसायिक कुटुंबाची मक्तेदारी होती. शिवाय कं. नीचीही दारूगोळा बनवण्याचा उद्योग होता आणि कं. नीला ठराविक हिस्सा राजाला विकावा लागत. राजाला विकायचा म्हणजे, राजा म्हणेल त्या किंमतीत राजाला द्यायचा. (पण फुकट नाही). त्यातून माल चांगला असला पाहिजे.

या उद्योगामध्ये कं. फारच अडचणीत सापडली, इतकी की, त्यांच्या इंग्लडमधून होणार्‍या चांदीच्या निर्याती वर त्यांना कर भरावा लागून, राजाधिराजांकडून सर्व कृपादृष्टीला पारखं व्हावं लागलं असतं.

यातून सर जॉन बँक्स ने राजा व कं. मध्ये मध्यस्थी घडवून आणली. या मध्यस्थी नुसार कं. राजाला ठराविक मीठ लिलावाद्वारे विकणार. या लिलावाची मुदत एका मेणबत्तीवर अवलंबून असे. एक इंच लांबीची मेणबत्ती जळेपर्यंत लिलाव चालू राहणार. या मध्यस्थीमुळे कं. मीठ निर्यात करू शकणार होती. हे कं. नीला व्यावसायिक दृष्ट्या लाभदायक होतं. लागोपाठ दोन वर्ष १६७२-१६७३ बँक्सने मध्यस्थी करवून कं. नीला अडचणीतून बाहेर काढले. याच काळात युरोपात युद्धे चालू असल्यामुळे मीठाला मागणीही मोठी होती.
असा हा व्यवसाय कं. नीचा चालू होता. (या काळात हे कुंपण घातले गेले असणार)

१८८० साली स्विस व फ्रेंच शास्त्रज्ञांनी कापूस दारूत मिसळून दारूगोळा तयार केला त्याआधी जर्मनीतील खाणींमध्ये या मीठाचा साठा सापडला. पुढे हेबर- बॉश यांनी पॉटेशियम नायट्रेट निर्माण करण्याची प्रक्रीया शोधून काढल्यावर नैसर्गिक मीठाची गरज संपुष्टात आली. भारतीय मीठाच्या व्यापाराचे कं. साठी महत्व १८८० नंतर उरले नाही.

हा सर्व इतिहास पाहता, ते कुंपण ई.ई.कं. नी ने स्वतःच्या व्यवसायासाठी घातलेले होते. त्याची व्यावसायिक गरज संपल्यावर कं. नी ने पूर्णपणे दुर्लक्षित करणे हे त्यांच्या व्यावसायिकतेशी मिळतेजुळते आहे. त्यामुळे कुंपणाचे अस्तित्व आता दिसत नाही.

आणखी एक, हे कुंपण भारताच्या मध्यभागात अफगाणिस्तानापासून ओरिसापर्यंत होते. (मीठ म्हट्लं की एकदम किनारपट्टीचा प्रदेश डोळ्यासमोर येतो तर तसे नाहिये.)

टिपः मी कुठलाही इतिहास तज्ञ नाही. त्यातून इंग्रजीच्या लेखाचा अनुवाद करण्याचा अनुभव नसून प्रयत्न आहे. गुगल मातेच्या शक्तीमुळे हा इतिहास माझ्यासमोर उभा राहिला तसा सर्वांसमोर मांडावा या दृष्टीने हा लेख. चू.भू.दे.घे.

श्रेय आव्हेरः मुळातून संदर्भ समजून घेण्यासाठी संदर्भ १ वाचावा.

संदर्भः

http://www.salt.org.il/frame_india.html
http://www.salt.org.il/saltpet.html
http://www.tax-news.com/archive/story/The_Best_Tax_Is_A_Dead_Tax_xxxx145...
http://www.rmoxham.freeserve.co.uk/salt%20starvation.htm Inland Customs Department. 1869. Report on the administration of the Inland Customs Department, 1868-69. Allahabad: Government Press.

1 comment:

A woman from India said...

खुपच छान माहितीपूर्ण लेख.
अजिबात कल्पना नव्ह्ती या संदर्भात.
धन्यवाद